News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Sunday, 21 December 2014

लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्याची दशसूत्री


पुण्यातील "आपला जनसंवाद" या पाक्षिकात माझे आरोग्य विषयक काही लेख छापून आले आणि मला गेल्या दीड महिन्यात पुण्यातून साधारण पाचशेपेक्षा अधिक फोन आले. लेखातील विषयाच्या अनुषंगाने आपल्या शारीरिक समस्यांवर चर्चा केल्यानंतर यापैकी सत्तर टक्के लोकांनी आपल्या किंवा आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या लठ्ठपणाचा आणि वाढत्या वजनाचा विषय काढलाच. त्यामुळे वाढत्या शहरीकरणातील बदलत्या जीवनपध्दतीने दिलेल्या या वाढत्या वजनाच्या घातक देणगीवर काही लिहावे असे मला वाटू लागले. त्यातूनच हा लेखप्रपंच करीत आहे. सगळ्यात आधी लठ्ठपणा निर्माण होण्यामागची कारणे कोणती हे पाहू - १. अतिसेवन - वारंवार खात राहणे, फास्ट फूड खाणे, तेलकट, मसालेदार आणि चरबीयुक्त अन्नाचे सतत सेवन, मद्यपान, अमर्याद चहा आणि कॉफी यांचे सेवन, हॉटेलमध्ये वारंवार जेवणे २. अवेळी भोजन - दोनवेळा आणि वेळा ठरवून जेवणे हे निसर्गाच्या नियमाला धरुन आहे. पण, या नियमाचे पालन केले नाही आणि वेळ मिळेल तेव्हा अथवा वाट्टेल तेव्हा भोजन केले की वजन वाढते. ३. जेवणाची चुकीची पध्दत - गडबडीत जेवणे, टी.व्ही पहात अथवा वाचन करत जेवणे, गप्पा मारत जेवणे, जेवल्यावर ताट बाजूला सरकवून तिथेच लगेच झोपणे. ४. विरुध्द अन्न खाणे - मासे, दूध, दही, फळे, पनीर हे आणि यापासून बनविलेले पदार्थ एकमेकांच्या विरुध्द आहेत. त्यांचे एकाचवेळी सेवन करणे. जिभेवर ताबा न ठेवता काहीही आणि कधीही, कसेही खाणे. ५. व्यायामाचा अभाव - वजन वाढण्याचे हे सगळ्यात मुख्य कारण आहे. एकाच जागी बसून काम करणे, अजिबात व्यायाम न करणे, चालण्याचा कंटाळा करणे. ६. काही पदार्थांचे वारंवार सेवन - पुरण पोळी, बासुंदी, श्रीखंड, मासे, मटण, अंडी, पनीर, मिठाई, हलवा, रबडी, दही हे पदार्थ वारंवार खाण्याने लठ्ठपणा वाढत असतो. ७. अनुवंशिकता - काही व्यक्तींमध्ये लठ्ठपणा ही अनुवंशिकता असते. त्यांनी वजन कमी करण्यासाठी फार कडक उपाययोजना करु नयेत. अशांनी यासाठी तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटावे आणि उपाय करावेत. ८. थायरॉईड - थायरॉईड ग्रंथींचे कार्य बिघडले तर काही व्यक्तींना लठ्ठपणा अथवा वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरात अचानक बदल झालाय असे लक्षात आले तर तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटून थायरॉईडची समस्य़ा आहे का याचे निदान करुन घ्यावे. ९. चिंता - वारंवार चिंता करणे, सतत ताण तणावात राहणे यामुळेही वजन वाढते. लठ्ठपणामुळे अथवा वाढत्या वजनामुळे ब्लडप्रेशर, डायबेटीस (मधुमेह), संधीवात, आमवात, हृदयरोग, त्वचा विकार, पित्ताशयाशी निगडीत व्याधी, मूतखडा, नपुसंकता, लैंगिक समस्या, चक्कर येणे, श्वसनाचे आजार, दम लागणे, लवकर म्हातारपण येणे असे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देणे आणि ते अटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. लठ्ठपणा किंवा वजन कमी कऱण्याची दशसूत्री - १. रोज सकाळी उठल्यावर अनुषापोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळावा, एक चमचा मध घालावा आणि ते प्यावे. यानंतर अर्धा तास काहीही खावू नये. या अर्ध्या तासात साधारण २ कि.मी. चालण्याचा व्यायाम करावा. दर आठवड्याला हे अंतर एका किलोमीटरने वाढवत पाच किलोमीटरपर्यंत जावे. नंतर एवढे रोज चालावे. २. सकाळचा नाष्टा आणि दुपारी जेवण ही पध्दत बंद करावी. त्याऐवजी सकाळी ९ ते १० यावेळेत पूर्ण जेवण घेण्याची सवय करावी. दुपारी भूक लागलीच तर काकडी खावी. रात्रीचे जेवणही संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत घ्यावे. सकाळच्या जेवणाच्या निम्म्याप्रमाणात रात्री आहार घ्यावा. रात्री जेवल्यानंतर किमान दोन तासांनी झोपावे. दोन्हीवेळेस जेवणाच्या आधी एक तास, जेवताना आणि जेवण झाल्यावर दीड तास अजिबात पाणी पिऊ नये. ३. दोन्हीवेळच्या जेवणाच्या आधी एक तास एक फ्लॅक्स सीड कॅप्सूल घ्यावी. दोन्हीवेळच्या जेवणानंतर लगेच फक्त घोटभर कोमट पाण्यासोबत एक स्पिरुलिना आणि एक मोरिंगा कॅप्सूल घ्यावी. रात्री झोपताना दोन व्हिटग्रास कॅप्सूल्स कोमट पाण्यासोबत एकाचवेळी घ्याव्यात. बाजारातून या कॅप्सूल्स घेताना त्याच्या शुद्धतेबाबत पूर्ण दक्षता घ्यावी. ते शक्य नसेल तर माझ्याशी संपर्क करावा. अतिशय उत्तम गुणवत्तेच्या आणि शुद्धतेच्याबाबतीत खात्रीशीर असलेल्या या कॅप्सूल्स मी तयार करतो. त्या मी तुम्हाला कुरीअरने घरपोहोच पाठवून देऊ शकतो. ४. मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, मांसाहार, हॉटेलचे खाणे आणि जेवणे, गोड पदार्थांचे भरपूर सेवन, चरचरीत आणि चमचमीत पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शिळे अन्न, पापड, लोणचे, केळी, आंबा, सिताफळ, दही, लोणी, तूप, पनीर, तूरीची डाळ हरभरा, उडीद, वांगी, बटाटा, घेवडा, पावटा हे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करावे. ५. पालेभाज्या, फळभाज्या, मूग, मसूर, मटकी, साय काढलेले दूध, लोणी काढलेले ताजे ताक यांचा आहारात समावेश अवश्य करावा. दूध शक्य असेल तर गाईचे वापरावे. ६. मेथी १०० ग्रॅम, ओवा ४० ग्रॅम आणि काळे जिरे २० ग्रॅम आणावेत. लोखंडाच्या कढईत हे तिन्ही वेगवेगळे साधारण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावेत. नंतर एकत्र करुन त्याचे चूर्ण करावे. रोज रात्री झोपताना व्हिटग्रास कॅप्सूल घेतल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यासोबत हे चूर्ण एक चमचा घ्यावे. ७. दर महिन्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे साजुक तूप घालून प्यावे. यामुळे दुसरे दिवशी सकाळी पोट साफ होत असल्याने हा प्रयोग सुट्टीच्या आधल्या रात्री करावा. ८. जाहिराती पाहून अथवा नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांच्या विक्रेत्यांचे ऐकून वजन कमी करण्यासाठी कसल्याही गोळ्या, पावडर, विविध प्रकारचे ज्यूस, औषधे आणि उपवास यांचे प्रयोग करु नयेत. असे प्रयोग वजन कमी करतीलही पण त्यामुळे शरीराचे नुकसानही होवू शकते. म्हणून असे काही प्रयोग करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ९. शीतपेये, फ्रीजमधील पदार्थ, थंड पदार्थ, थंड पाणी अजिबात सेवन करु नये. शक्य असेल तर सगळ्याच ऋतुत कोमट पाणी पिणे अधिक चांगले. चहा, कॉफी पूर्णपणे बंद करावी. १०. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहारातून साखर पूर्णपणे हद्दपार करावी. त्याजागी गुळाचा वापर करावा. " साखरेचे खाणार त्याला लठ्ठपणा येणार " हे नेहमी लक्षात ठेवावे. या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचे आहे. ताण तणावातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. ते शक्य नसेल तर दररोज किमान एक तासभर मनाला आनंद देणारा एखादा छंद जोपासावा. जुनी गाणी, शास्त्रिय संगीत ऐकावे, हलके फुलके वाचन करावे, निखळ करमणूक करणारे कार्यक्रम पहावेत. डोक्याला ताण देणा-या आणि रडक्या मालिका पाहू नयेत. महिन्यातून एकदा निसर्गाच्या सान्निध्यात शक्य तेवढे पायी फिरावे. आध्यात्माची आवड असेल तर त्यातील ध्यान धारणेसारखे मनाला शांत करणारे प्रयोग करावेत. तीर्थक्षेत्रांना जावे. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणा-यांनी दोन गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, मला वाटते म्हणून माझे वजन वाढले आहे, याला काही अर्थ नाही. तुमच्या उंचीला १२ ने गुणल्यावर जे उत्तर येईल त्यापेक्षा अधिक तुमचे वजन असू नये, असे मानले जाते. (उदा. उंची ५ फूट ४ इंच असेल तर त्याला गुणीले १२ म्हणजे ६४ ते ६५ किलोपेक्षा अधिक वजन असणे उचित नाही) तर दुसरी गोष्ट म्हणजे, दरमहा एक ते तीन किलो याच प्रमाणात वजन कमी होणे योग्य आहे. झपाट्याने वजन कमी झाले तर ते घातक असते. केवळ डाएट करुन, केवळ औषधे घेवून अथवा केवळ भरपूर व्यायाम करुन लठ्ठपणा किंवा वजन कधीच कमी होणार नाही. योग्य आहार, योग्य आणि आवश्यक तेवढा व्यायाम, योग्य औषधांचे सुयोग्य नियोजन आणि पचनशक्ती वाढवून स्थूल तसेच सूक्ष्म पचनात आणलेली सूसूत्रता यामुळेच वजन कमी कऱण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. डॉ. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर, जि. कोल्हापूर मो. 7744964550 ई मेल -asknaturopathy@gmail.com

Monday, 8 December 2014

प्रतिजैविकांचा होणारा अतिरिक्त वापर थांबविलाच पाहिजे.


प्रतिजैविके म्हणजे अण्टीबायोटिक्स औषधे. सध्या या औषधांचा उपयोग करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. माणसाच्या शरीरात शिरलेल्या आणि रोग उत्पन्न करणा-या जीवाणूंना आणि विषाणूंना मारण्यासाठी केलेली विशिष्ट प्रकारची औषध योजना म्हणजेच प्रतिजैविके होत. या प्रतिजैविकांच्या उपयोगाने शरीरात शिरलेले जीवाणू आणि विषाणू मारले जात असल्याने आजाराच्या लक्षणापासून आपणाला तात्काळ आराम मिळतो. सध्याच्या धावत्या जगात म्हणजेच ‘घे गोळी आणि पळ कामाला’च्या युगात तात्काळ आराम देण्याचा हा प्रतिजैविकांचा गुणधर्म म्हणजेच आपणाला साक्षात ईश्वराचे वरदान वाटत आहे. त्यामुळे आधुनिक उपचार पध्दतींच्या वैद्यांकडे, ‘मला एखादे अण्टीबायोटिक द्या’, अशी मागणी करणारे रुग्णही आता दिसू लागले आहेत. वास्तविक पाहता आपल्या शरीरात बाहेरुन येणा-या विषाणू आणि जीवाणूंशी लढणारी यंत्रणा असतेच. ही यंत्रणा नैसर्गिकपणे त्यांच्याशी लढत असते. शरीरातील या यंत्रणेने आपले काम सुरु केले की, त्याची काही लक्षणे शरीरावर उमटू लागतात. खरे तर शरीरातील ही यंत्रणा शरीर स्वच्छ करण्यासाठी धडपडत असल्याचे हे द्योतक आहे. पण, या लक्षणांना आजार मानण्याची कल्पना आपणाकडे आहे आणि याच आजारावर आपण औषध सुरु करीत असतो. वास्तविक पाहता शरीरातील अंतर्गत यंत्रणा जे शरीर शुध्दीचे काम करीत आहे, त्याला पूरक ठरेल अशी भूमिका आपण घ्यायला हवी. आपण तशी भूमिका घेऊन शरीराला या कामात मदत करण्याचा साधा विचारही आपण करीत नाही. उलट चटकन बरे होण्यासाठी आपण प्रतिजैविकांचा मारा शरीरावर करीत असतो. त्यामुळे शरीराच्या या कामात अडथळेच तयार होतात. प्रतिजैविकांच्या सेवनाने विषाणू आणि जीवाणू नष्ट होतातही पण, हे जीवाणू आणि विषाणू शरीरात वाढण्यासाठी पूरक ठरलेली शरीरातील घाण आणि व्यवस्था तशीच राहते. साहजिकच लक्षणे बरी झाल्याने आपणाला आजार बरा झाल्याचे समाधान मिळते. पण, आजाराला पोषक असणारी शरीराची व्यवस्था तशीच राहिल्याने कालांतराने आजार परत उदभवतो आणि हे समाधान क्षणिक ठरते. आपणाला माहिती झालेली असते की, अमूक प्रकारच्या लक्षणांमध्ये अमूक गोळ्या घेतल्या की, आपणाला तात्काळ आराम मागच्या वेळेस मिळाला होता. मग वैद्यकीय सल्ल्याची गरज आपणाला रहात नाही आणि औषधांच्या दुकानातून त्या गोळ्या आणून आपण परस्परच सेवन करीत जातो. अशा प्रकाराने साधी सर्दी झाली तरी कळत न कळत अशी प्रतिजैविके घेणारी अनेक माणसे आम्ही पाहिली आहेत. प्रतिजैविकांचा एक गुणधर्म असतो. एकदा त्याची सवय झाली की, ती घेतल्याशिवाय आजार बराच होत नाही. त्याही पुढे जाऊन त्याच्या मात्रेची (डोस) सवय होते आणि मग त्याचा परिणाम दिसावा यासाठी पुढे प्रत्येकवेळी त्याची मात्रा वाढवतच जावे लागते. अशी किरकोळ कारणाने प्रतिजैविके घेण्याची रुग्णांचीही हौस काही डॉक्टरांनी नेमकी हेरली आहे. ‘‘अमूक डॉक्टरकडे गेलो ... एक इंजेक्शन आणि दोनच गोळ्या घेतल्या...सकाळी उठून फिरायला लागलो, ’’ असं सांगत रुग्ण गावभर फिरुन जाहिराती करीत असल्याने असे डॉक्टरही आता कसलाच विचार न करता साध्यासुध्या आजारातही इंग्रजीत ज्याला ‘हाय्यर अण्टीबायोटिक्स’ म्हणतात, ती देत असतात. सध्या वैद्यकीय क्षेत्राचा उपयोग सेवा भावापेक्षा व्यवसाय म्हणून करण्याकडे कल वाढत आहे. पूर्वी वैद्यकीय व्यवसाय घराण्याची परंपरा होती. कसलाही खर्च न करता एका पिढीकडून दुस-या पिढीला हे ज्ञान हस्तांतरित करण्यात येत होते. साहजिकच शिकण्याचा खर्च नसल्याने त्यातला सेवाभावही वैद्यकीय शिक्षणाचे एक अविभाज्य अंग म्हणून शिकवला जात होता. आता घरात मिळणारे हे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात गेले. साहजिकच त्यातही व्यावसायिक दृष्टीकोनाची मंडळी शिरली आणि या क्षेत्राचाही व्यवसाय झाला. लाखो रुपये खर्च करुन पदवी घेतलेले हे डॉक्टरही मग या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणूनच पाहू लागले आणि रुग्ण म्हणजे गि-हाईक झाले. ते कायम आपल्याकडेच येत रहावे, यासाठी त्याला तात्काळ बरे वाटले पाहिजे म्हणून अशा प्रतिजैविकांचा वारेमाप वापर करण्याची पध्दत यातूनच वाढत चालली आहे. प्रतिजैविकांच्या या परिणामांसोबतच त्यांचे होणारे दुष्परिणामही खूप आहेत. विविध अवयवांवर होणारे त्याचे परिणाम भविष्यात माणसाला सोसावेच लागतात. म्हणूनच या सगळ्याचा गंभीरपणाने विचार केला तर प्रतिजैविकांचा अतिरिक्त आणि अनावश्यक वापर म्हणजे ‘रोग परवडला, पण औषधे नकोत,’ यातलाच प्रकार आहे. म्हणूनच प्रतिजैविकांचा होणारा अतिरिक्त वापर थांबविलाच पाहिजे.

Tuesday, 2 December 2014

शरीरासाठी पोषक घटकांचा खजिना - स्पिरुलिना


आर.टी.ओ. कार्यालयात काम करणारी एक व्यक्ती माझ्यासमोर रेल्वेत बसली होती. प्रवास सुरु असतानाच मला नांदेडमधून माझ्या एका पेशंटचा फोन आला. आमचे बोलणे समोर बसलेली ही व्यक्ती लक्षपूर्वक ऐकत होती. बोलणे संपल्यावर त्या व्यक्तीने स्वतःचा परिचय करुन दिला आणि मला विचारले, ‘‘ तुम्ही डॉक्टर आहात का ?’’ मी उत्तर दिले, नाही... मी निसर्गोपचार सल्लागार आहे.’’ माझ्या उत्तराने त्यांची जिज्ञासा जागी झाली आणि त्यांनी आपले शारीरिक त्रास मला सांगायला सुरुवात केली. त्यांचे सुमारे अर्धातास ऐकून घेतल्यावर माझ्या लक्षात आले की, त्यांना काहीही झालेले नाही. शरीराची दैनंदिन गरज भागविण्यासाठी आणि शरीराची होणारी झीज भरुन काढण्यासाठी जे घटक शरीरात दररोज गेले पाहिजेत ते त्यांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत थकल्यासारखे वाटणे, उत्साह नसणे, वजन वाढणे, पोट साफ न होणे, साथीच्या रोगांची तात्काळ लागण होणे, जडत्व आल्यासारखे वाटणे, सारखे झोपून रहावे असे वाटणे, वारंवार पित्त होणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कामावर आणि करिअरवर झाला आहे. त्यातच भरीस भर म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्राच्या तज्ज्ञांनी त्यांना करावयास लावलेल्या एक्स रे पासून एम.आर.आय. पर्यंतच्या अनेक तपासण्या आणि घ्यायला लावलेली औषधे याच्या खर्चामुळे ते पार वैतागून गेले होते. इतके करुनही त्यांना बरे वाटत नव्हतेच हा भाग वेगळाच! ! मी त्यांना स्पिरुलिनाच्या कॅप्सूल्स दिल्या. सकाळी आणि रात्री जेवणानंतर एक एक कॅप्सूल घेण्यास सांगितले. माझा मोबाईल नंबर दिला आणि सांगितले कॅप्सूल्स घ्यायला लागल्यापासून पंधरा दिवसांनी मला फोन करा आणि तुमची प्रगती सांगा. सोळाव्या दिवशी रात्री साडे दहा वाजता त्यांचा फोन आला. खूप उत्साहात ते बोलत होते. ‘‘ आनंदराव, चमत्कार झालाय ! ! आज मी माझ्या गावापासून शंभर किलोमीटरवर असलेल्या गावात आर.टी.ओ. कॅम्पला गेलो होतो. दिवसभरात दोनशे गाड्या पासिंग केल्यात. आत्ता परत आलोय पण, अजून फ्रेश आहे. अजिबात थकवा वाटत नाही. बाकीचे सगळे त्रासही कमी झालेत. तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही साहेब ! ! तुम्ही आता आमचे फॅमिली मेंबर आहात, कधीही आमच्या गावी, घरी हक्काने या ! !’’ मी धन्यवाद म्हणून फोन बंद केला आणि मला खूप समाधान वाटले. काय आहे स्पिरुलिना ? स्पिरुलिना ही निळ्या हिरव्या रंगाची आणि अनेक शाखा असणारी फोटोसिंथेटिक पाणवनस्पती आहे. प्रामुख्याने ही वनस्पती समुद्रात आढळते. शेवाळ्यासारखी असणारी ही वनस्पती तिच्या नागमोडी आकारामुळे ‘स्पिरुलिना’ या नावाने ओळखली जाते. मेक्सिको आणि मध्य आफ्रिकेतील लोक ही वनस्पती अगदी नैसर्गिक स्वरुपातही खातात. शास्त्रज्ञांना स्पिरुलिनातील पोषक तत्वांचा शोध सन १९६० मध्ये लागला. त्यानंतर स्पिरुलिना पृथ्वीवरील सर्वात शक्तीवर्धक प्रोबायोटिक पूरक अन्न म्हणून जगभरात वापरण्यात येवू लागले. आज जगभरातून लाखो लोक याचा पूरक अन्न म्हणून बिनधास्तपणे वापर करत असतात. इतकेच नव्हे तर सन १९७४ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने सर्वात चांगले शक्तीवर्धक पूरक अन्न म्हणून स्पिरुलिनाचे समर्थन केले आहे. सन १९८१ मध्ये फूड ऍण्ड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशननेही स्पिरुलिनाचा गौरव केला आहे. सन १९८३ मध्ये पश्चिम जर्मनीच्या इंटरनॅशनल फूड एक्स्पोजर या संस्थेनेही स्पिरुलिनाचे समर्थन केले आहे. स्पिरुलिनातून काय मिळते ? उत्तम जीवन, शक्तीशाली आणि सुदृढ शरीर यासाठी स्पिरुलिना हा आदर्श पूरक आहार आहे हे त्यातून मिळणारे घटक पाहिले की लगेच लक्षात येईल. रोज सकाळी एक आणि रात्री एक याप्रमाणे सलग सहा दिवस स्पिरुलिनाच्या बारा कॅप्सूल्स पोटात गेल्या (साधारण ६००० मिलीग्रॅम) तर शरीराला खालीलप्रमाणे पोषक घटक मिळतात. १) बीटाकॅरेटिन ः ५६ ग्लास गाईचे दूध प्याल्यावर अथवा ५५० सफरचंद खाल्ल्यावर जितके बीटाकॅरेटिन मिळेल तितके आणि गाजरापेक्षा २५ पट अधिक २) व्हिटॅमिन बी १ ः हिरव्या मिरच्या २० खाल्ल्यावर जितके मिळेल इतके ३) व्हिटॅमिन बी २ ः ४२० द्राक्षे अथवा ४७ स्ट्रॉबेरीज खाल्ल्यावर जितके मिळेल इतके. ४) व्हिटॅमिन बी ३ ः आठ लिंबू खाल्ल्यावर जितके मिळते तितके ५) व्हिटॅमिन बी ६ ः ९० ग्रॅम ब्रेडपासून जितके मिळते तितके ६) व्हिटॅमिन बी १२ ः २४० ग्रॅम पनीर पासून जितके मिळते तेवढे ७) व्हिटॅमिन ई ः चिकनचे सहा तुकडे खाल्ल्यावर जितके मिळेल तितके. पालेभाज्यांपेक्षा ३ टक्के अधिक ७) प्रोटिन्स ः पालेभाज्यांपेक्षा ६० टक्के अधिक, दुधापेक्षा १४ टक्के अधिक, अंड्यापेक्षा ६ टक्के अधिक तर कडधान्यापेक्षा ३ टक्के अधिक ८) जैविक लोह घटक ः पालेभाज्यांपेक्षा पाच ते आठ पट अधिक ९) क्लोरोफिल ः अल्फा अल्फापेक्षा ५ ते ३० पट अधिक याशिवाय स्पिरुलिनामध्ये २९ टक्के फॅटी ऍसिड असते. त्यामुळे शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल हटवले जाते, चरबी वितळवून शरीराबाहेर टाकली जाते आणि हृदयाचे रक्षण होते. स्पिरुलिना कोणत्या आजारात फायदेशीर आहे ? विविध शरीरोपयोगी घटकांनी परिपूर्ण असणारे हे स्पिरुलिना शरीरातील पौष्टिक घटकांची कमतरता भरुन काढते. शरीराची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. फुफ्फुसांना अधिकप्रमाणात प्राणवायू मिळावा यासाठी काम करते. पेशींना बळकट बनविते. शरीराची चयापचय क्रिया सुधारते. रक्ताभिसरण वाढवते. सर्वसाधारण आजार आणि जुने आजार यावर काम करते. ऍनेमिया, हृदयाशी संबंधीत आजार, अकाली येणारे वृध्दत्व, लठ्ठपणा, अल्सर, मानसिक ताण, पचनसंस्थेचे विविध आजार, दीर्घकाळापासूनचा संधीवात, डोळ्याच्या आणि केसांच्या समस्या, स्मृतीभ्रंश अशा आजारात तर स्पिरुलिना खूपच छान फायदा देते. त्याचबरोबर कॅन्सर आणि एचआयव्ही सारख्या पेशींशी संबंधित आजारातही स्पिरुलिना प्रभावीपणे काम करते. स्पिरुलिना शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढते आणि विषारी पदार्थांच्या आघातापासून मूत्रपिंडाचे (किडनी) रक्षण करते. उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि वाढत्या वयासोबत येणारे आजार यासाठी तर स्पिरुलिना संजीवनीच म्हणावी लागेल. स्पिरुलिना हे समृध्द शक्ती, कमी कॅलरीज आणि सहज पचणारे पूरक अन्न आहे. म्हणूनतर ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने त्याचा वापर आणि गौरव केला आहे. गेल्या साडेतीन लक्ष वर्षांपासून लहरी निसर्ग, सततचे प्रदूषण अशा नेक उलथा पालथींशी टक्कर देत स्पिरुलिना आपले नैसर्गिक गुणधर्म जसेच्या तसे टिकवून आहे, हा निसर्गाचा अजब चमत्कारच म्हणावा लागेल. स्पिरुलिना स्वस्त आणि सामान्य माणसाला परवडेल असे आहे. म्हणजे दिवसाचा खर्च दहा रुपये आहे. आपला रोजचा चहाचा खर्च यापेक्षा नक्कीच जादा असतो आणि त्याचा शरीराला फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक होतो. त्याही पुढे जाऊन विचार करायचा तर निरोगी राहण्यासाठी रोजचा दहा रुपये खर्च हा आजारी पडल्यावर होणार्या दवाखान्याच्या खर्चापेक्षा नक्कीच कमी आहे, नाही का ? स्पिरुलिना आजारी असलेल्यांनी तर घ्यावेच पण ज्यांना कसलाही आजार नाही अशा निरोगींनीही कायमपणे रोगमुक्त राहण्यासाठी अवश्य घ्यावे. याबाबत अधिक माहिती अथवा अतिशय उत्तम प्रतिच्या स्पिरुलिना कॅप्सूल्स हव्या असतील तर माझ्याशी जरुर संपर्क साधावा. मी उपलब्ध करुन देईन. डॉ. आनंद कुलकर्णी , निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर), मोबाईल - ७७४४९६४५५०

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog