परवाच माझा एक जुना मित्र भेटला. एकेकाळी तब्बेतीने स्ट्रॉंग असणारा गडी पुरता ढासळला होता. मी त्याला विचारल्यावर म्हणाला, वजन घटविण्यासाठी उपचार केले आणि तब्बेत पार ढासळली. अगदी मृत्यूच्या
उंब-याला स्पर्श करुन आलो. कुणी सांगितला उपाय ? या प्रश्नावर मात्र त्याने मौन पाळले. फारच खोदून विचारल्यावर वजन वाढवा ... वजन घटवा वाले इतकच तो म्हणाला. जाऊ द्या म्हणून त्याने विषयावर पडदा टाकला पण माझ्या मनातून हा विचार जात नव्हता. लाखात एखाद्याला असं होते असे या उपचार कऱणा-याने आमच्या या मित्राला सांगितले असं तो म्हणाला.
उंब-याला स्पर्श करुन आलो. कुणी सांगितला उपाय ? या प्रश्नावर मात्र त्याने मौन पाळले. फारच खोदून विचारल्यावर वजन वाढवा ... वजन घटवा वाले इतकच तो म्हणाला. जाऊ द्या म्हणून त्याने विषयावर पडदा टाकला पण माझ्या मनातून हा विचार जात नव्हता. लाखात एखाद्याला असं होते असे या उपचार कऱणा-याने आमच्या या मित्राला सांगितले असं तो म्हणाला.
शरीराचे वजन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी जसे अनेकजण प्रयत्नशील अाहेत तसेच वजन वाढावे यासाठीही प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. लोकांच्या या मानसिकतेचा फायदा आपल्या देशातील नेटवर्क मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांनी बरोबर उचलला आहे. दिवसदिवस मश्रुम पावडरवर किंवा प्रोटिन पावडरवर रहायला सांगून कसलाही व्यायाम न करता वजन कमी करण्याचा दावा या कंपन्यांचे एजंट करीत असतात. मुळातच व्यायामाचा कंटाळा असलेले आपल्याकडचे लोक यावर मग विश्वास ठेवतात आणि कसलीही वैद्यकीय पदवी अथवा पदविका नसलेल्या या सेल्समनचे ऐकून उपाशीपोटी पावडर खात राहतात. यातूनच मग अशी जिवावर बेतणारी घटना घडते आणि भीक नको पण कुत्र आवर म्हणण्याची वेळ येते.
माझ्याकडेही अनेकजण वजन वाढविण्याचे किंवा कमी करण्याचे उपाय विचारायला येतात. आजवर मी अनेकांना याबाबत सल्लाही दिला आहे. त्यामुळे कसलाही धोका न होता त्यांचे वजन प्रमाणात आले आहे. यातील कुणालाही आपण प्रोटिन पावडर खायला घालून उपवास करायला सांगितला नव्हता.
वाढलेले वजन कमी कऱणे वाटते तितके सोपे नाही. खरं तर हा एक कार्यक्रमच आहे. सगळ्यात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की कसलाही व्यायाम न करता वजन कमी करणे म्हणजे निसर्गाच्या कामात व्यत्यय आणणेच आहे. आपण जितके खातो तितके उपयोगात आणले नाही तर त्याची चरबी होते आणि वजन वाढते हे साधे सूत्र लक्षात घेतले तर वजन कमी कऱण्याचा कार्यक्रम दोन टप्प्याचा असणे आवश्यक आहे. त्यातील पहिला टप्पा हा संचित चरबी नष्ट कऱणे हा जितका महत्त्वाचा आहे तितकाच दुसरा टप्पा चरबीचा संचय होणार नाही अशी दिनचर्या तयार करुन देवून त्याची सवय लावणे हाही महत्त्वाचा आहे. म्हणूनच हा एक दहा कलमी कार्यक्रमच होवू शकतो. आम्ही त्याला वजन कमी करण्याची दशसूत्री म्हणतो.
ही दहा सूत्रे अशी आहेत -
1. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावे.
2. त्यानंतर किमान चार किलोमीटर जलद गतीने चालावे. सुरुवात एक किलोमीटरने करावी. दर तीन दिवसाला एक किलोमीटर वाढवावे. हे शक्य नसेल तर दररोज 24 सूर्यनमस्कार घालावेत. सुरुवात पाच पासून करावी आणि दर तीन दिवसाला एक नमस्कार वाढवित जावे.
3. शौचाला साफ होत नसेल एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप टाकून प्यावे. पहिल्या आठवड्यात रोज घ्यावे. नंतर दोन दिवसाआड घ्यावे. तीन महिन्यापेक्षा अधिकाकाळ घेवू नये.
4. हे खाऊ नये - बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक पूड, गहू, दही, दूध नासवून बनविलेले पदार्थ, मांसाहार, थंड पेय, थंड पदार्थ, आईस्क्रिम, ज्यूस, शिळे अन्न, विदेशी फळ
5. हे खावे - ज्वारी, नाचणी, बाजरी, लोणी काढलेले ताजे ताक, सगळ्या भाज्या, भारतीतील फळ, ताजे अन्न,
6. सकाळचे जेवण 11 पूर्वी आणि रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यावे. दुपारी भूक लागलीच तर हलका नाष्टा किंवा एखादे फळ खावे. सूर्यास्तानंतर काही खाऊ नये.
7. जेवणापूर्वी एक तास, जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये. जेवताना घोटघोट थोडे प्याले तरी चालेल. पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नये. अर्धे पोट घट्ट अन्नाने, एक चतुर्थांश पोट पातळ पदार्थाने भरावे तर एक चतुर्थांश पोट मोकळे ठेवावे. जेवणानंतर गोड खाऊ नये. जेवणाच्या सुरुवातीस किंवा मध्ये खावे.
8. जेवणानंतर लगेच किंवा दुपारी झोपू नये. जमिनीवर मांडी घालून बसून जेवावे. उभ्याने अजिबात जेवू नये. घाईगडबडीत जेवू नये. मोबाईल, टिव्ही पहात किंवा वाचन करीत जेवू नये.
9. रात्री 10 वाजता झोपावे आणि पहाटे पाच वाजता उठावे. जाग्रणे टाळावीत तसेच अती झोपही टाळावी. एकाच जागी बसून राहू नये. शरीराची हालचाल होईल अशा पध्दतीने वस्तू ठेवाव्यात. मध्यवर्ती ठिकाणी गाडी पार्क करुन सगळी कामे चालत जाऊन करावीत. लिफ्ट आणि एसी यांचा वापर करु नये. रात्रीचा प्रवास करु नये.
10. मानसिक ताणतणावाचा वजन वाढीशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे ताणतणाव कमी कऱण्यासाठी ध्यानधारणा करावी. आध्यात्मात किंवा एखाद्या छंदात मनावरील ताण हलका करावा. वाचन करावे.
या उपायांनी या समस्येवर मात करता येते. पण हे सगळे उपाय म्हणजे दिनचर्चेतील बदलच आहे. त्यामुळे पुन्हा वजन वाढणार नाही. पण संचित चरबी कमी करण्यासाठी काही पूरक अन्नाची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी Cap. Flax Seed + Cap. Aloevera + Cap. Spirulina हे कॉम्बिनेशन चांगला फायदा देते असा माझा अनुभव आहे. या कॅप्सूल्स कशा घ्यायच्या ते मी त्या पाठवताना लिहून देतो. त्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा.
आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर 416101
मोबाईल - 7744964550 (whats app)
No comments:
Post a Comment