News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Sunday, 30 November 2014

मधुमेह, रक्तदाब विकारावर प्रभावी दशसूत्री


गेल्या महिन्यातील गोष्ट आहे. मराठवाड्यातून एक रुग्ण माझ्याकडे आला. त्याला डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर असे दोन्ही आजार होते. त्याचे वजनही भरपूर होते. रक्तातील साखर २२० च्या खाली येतच नाही, अशी त्याची तक्रार होती. बाजारात मिळणारी अनेक औषधे आणि विविध नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांच्या कसल्याकसल्या पावडरी खाऊनही त्याचे वजन शंभर ग्रॅमही कमी झाले नव्हते. अनेक डॉक्टर झाले, विविध औषधांवर हजारो रुपये खर्च केले, दरमहा तीन हजाराच्या मधुमेहाच्या गोळ्या घेतो पण काहीच फरक नाही, अशा तक्रारी तो सांगत होता. त्याला सुमारे अर्धातास प्रश्न विचारुन त्याचा इतिहास समजून घेतल्यावर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मी त्याला माझ्याकडील निसर्गोपचाराची दशसूत्री दिली. महिनाभर त्याला निष्ठेने करायला सांगितले. परवाच त्याचा फोन आला होता. रक्तातील साखर जेवणानंतर १८० आणि उपाशी पोटी १०० आहे. वजनही एक किलो कमी झाले आहे. ब्लडप्रेशरही नॉर्मल आहे, असे तो म्हणाला. खूप उत्साहात होता. काय आहे ही दशसूत्री ? १) १०० ग्रॅम हिरडा चूर्ण, २०० ग्रॅम बेहडा चूर्ण आणि ३०० ग्रॅम आवळा चूर्ण आणावे. घरामध्ये ते चांगले एकत्र करावे आणि काचेच्या बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री एक चमचा हे चूर्ण आणि ज्या चमच्याने हे चूर्ण घेतले त्याच चमच्याने अर्धा चमचा मेथी घ्यावी. हा चमचा कायमस्वरुपी यासाठीच वापरावा. हे दोन्ही एक ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत घालावे. सकाळी उठल्यावर ब्रश झाला की हे पाणी प्यावे आणि खाली राहिलेली मेथी चावून चावून खावी. यानंतर अर्धा तास काही खाऊ नये. २) या अर्ध्या तासात चालण्याचा व्यायाम करावा. व्यायाम आपल्या शरीराला सोसेल इतकाच असावा. याबाबत कुणाचे ऐकून काही करु नये. त्यामुळे चालताना नेहमीच्या गतीनेच चालावे तसेच काखेत आणि डोक्यात घाम आला की चालणे थांबवावे, हे सूत्र लक्षात ठेवावे. ३) सकाळी आणि रात्री जेवणानंतर मोड आणलेल्या जवसाची पावडर ३ ग्रॅम आणि शेवग्याच्या पानांची पावडर ३ ग्रॅम पाण्यासोबत घ्यावी. आता याच्या कॅप्सूल्सही मिळतात. कॅप्सूल्स घेणार असाल तर दोन्हीची एक एक कॅप्सूल सकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर घ्यावी. तसेच स्पिरुलिनाची एक कॅप्सूल सकाळी आणि एक रात्री जेवणानंतर घ्यावी. ४) सकाळचे जेवण १० च्या आधी आणि रात्रीचे जेवण ८ च्या आधी घ्यावे. दोन जेवणाच्यामधे दुपारी भूक लागली तर हलकासा नाष्टा अथवा सफरचंद खावे. रात्रीच्या जेवणानंतर सुमारे एक तासाने झोपावे. ५) तुमचे वजन भागिले दहा वजा दोन या फॉर्म्युलॅने गणित करावे आणि जितके उत्तर येते तितके लिटर पाणी दिवसभरात प्यावे. याबाबत उलटसुलट मतप्रवाह ऐकवून गोंधळ केला जातो. पण हा योग्य फॉर्म्युला आहे. पाणी खाली बसूनच प्यावे. घोट घोट प्यावे. जेवणाच्या आधी एक तास आणि जेवताना तसेच जेवणानंतर दीड तास पाणी पिऊ नये. पाणी शक्यतर कोमट प्यावे अथवा रुम टेम्परेचरचे प्यावे. फ्रिजमधले पिऊ नये. थंड पाणीच प्यायचे असेल तर मातीच्या मडक्यातील प्यावे. ६) बटाटा, बीट, रताळे, गाजर, साबूदाणा, मका, ज्वारी, मसालेदार पदार्थ, मांसाहार, गोड पदार्थ, चहा कॉफी, साखर, आंबा, चिक्कू अशी गोड फळे, कडधान्ये, तूरडाळ, आंबाडी, दोडका, बेकरीचे पदार्थ, मिठाई, मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करावेत. ७) गहू, पालेभाज्या, फळभाज्या, जांभूळ, कारले, कोंडायुक्त पदार्थ यांचा आहारात वापर करावा. रोजच्या जेवणात सकाळी आणि संध्याकाळी एक वाटी भात खाल्ला तरी चालेल. ताजे ताक एक वाटी जेवणानंतर प्यावे. जेवणात दही घ्यावे. गव्हाचे पदार्थ (पोळी अथवा चपातीसारखे) खाताना त्यावर एक छोटा चमचा तूप घ्यावे. साखरेऐवजी थोड्या प्रमाणात गुळ वापर तर चालतो. ८) जेवणासाठी खाली मांडी घालून बसावे. जेवताना टीव्ही बंद ठेवावा. मोबाईलवर बोलत जेवू नये. जेवताना लक्ष पूर्णपणे जेवणाकडे असावे. सकाळचे जेवण पोटभर घ्यावे पण रात्री कमीच जेवावे. जड पदार्थ रात्री खाऊ नयेत. हलका आहार घ्यावा. ९) शौचाला साफ होत नसल्याची तक्रार असेल तर पंधरा दिवसातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून ढवळून प्यावे. १०) हे उपचार सुरु केल्यावरही सध्या सुरु असलेली डॉक्टरांची औषधे बंद करु नयेत. दर महिन्याला रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे तसेच रक्तदाबही तपासावा. त्याचे रीपोर्टस डॉक्टरांना दाखवावेत. त्यानुसार डॉक्टरांच्या औषधांचे प्रमाण कमी कऱणे अथवा ती बंद करणे बाबत ते सल्ला देतील तसेच करावे. या दशसूत्रीचा उपयोग केल्यास मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. त्यासाठी घ्यावी लागणारी आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधे कमी होतात आणि त्यांच्या साईड इफेक्टसपासून बचाव होतो. जवस, शेवगा या फूड सप्लिमेंटचा मधुमेह आणि रक्तदाबाशिवाय कॅन्सर, रक्तवाहिन्यांचे विकार, हृदयरोग, अस्थमा, संधीवात, थायरॉईड, सूज, किडनीचे आजार, बध्दकोष्ठता, पोटाचे विकार, लैंगिक क्षमता, लठ्ठपणा अशा विविध आजारातही खूपच चांगला फायदा होतो. फक्त हे आजार क्रॉनिक असल्याने या आजारात निसर्गोपचार सल्लागारांच्या सल्ल्यानेच याचा उपयोग करणे योग्य ठरेल. उत्तम प्रतिची जवसाची कॅप्सूल, शेवग्याच्या पानांच्या पावडरची कॅप्सूल आणि स्पिरुलिना कॅप्सूल मी उपलब्ध करुन देत असतो. ज्यांना याबाबत अधिक माहिती हवी असेल त्यांनी माझ्याशी फोनवर अथवा ई मेलवर जरुर संपर्क साधावा. डॉ. आनंद कुलकर्णी, निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर मोबाईल - ७७४४९६४५५० ई मेल - asknaturopathy@gmail.com

1 comment:

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog