१. कोणतेही साबण, शाम्पू वापरु नये. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून ते अंगाला लावावे आणि स्नान करावे. देशी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच. नसेल तर म्हशीचे वापरावे पण जर्सी चे अजिबात नको.
२.आंबेहळद दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी.
३. व्हिटग्रास कॅप्सूल, अॅलोव्हेरा कॅप्सूल्स, नीम कॅप्सूल घ्याव्यात. या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
४. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. त्यानंतर तीन दिवसांनी एक दिवसाचा पूर्ण उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त पाणी आणि जिऱ्याची फोडणी दिलेले ताजे ताक दर दोन तासांनी एक एक ग्लास प्यावे.
५. गहू, तूर डाळ, मैद्याचे पदार्थ, आंबट व आंबवलेले पदार्थ, शिळे, फ्रिजमधील पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, दूध दही आणि फळांचे एकत्र सेवन, आंबाडी अजिबात खाऊ नये.
६. ज्वारी, फळ, फळभाज्या, पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा.
७. आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास याप्रमाणे ताजे गोमूत्र मिसळावे. उपलब्ध नसेल तर गोमूत्र अर्क वापरला तरी चालेल.
८. रोज पहाटे सूर्योदयाच्यावेळी साधारण ४ कि.मी. चालावे.
९. कडक ऊनापासून त्वचेचे रक्षण करावे. जाग्रण करु नये. पचन बिघडेल असे काही करु नये.
१०. सकाळचे जेवण दहापूर्वी आणि रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान घ्यावे.
आनंद कुलकर्णी,
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मो. 7744964550 ( What's app)
No comments:
Post a Comment